पती दुबईत गेला..पत्नीला दिरासोबत रात्री 12 वाजता नको त्या अवस्थेत पकडलं! अख्ख्या गावाला समजलं अन्..

मुंबई तक

Married Woman Shocking Viral News :पती दुबईत पैसे कमवण्यासाठी गेला. त्यानंतर त्याची पत्नीचं दीरासोबत प्रेमप्रकरण सुरु झालं. पती जेव्हा दुबईहून परतला, तेव्हा पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती

ADVERTISEMENT

फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
फतेहाबाद टोहाणामध्ये पत्नी आणि प्रियकराची हत्या करून पतीने खळबळ उडवली, प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री बारा वाजता महिला घराबाहेर पडली अन् घडलं..

point

पत्नीचे दीरासोबत सुरु होते प्रेमप्रकरण

point

एक दिवस घडली धक्कादायक घटना

Married Woman Shocking Viral News :पती दुबईत पैसे कमवण्यासाठी गेला. त्यानंतर त्याची पत्नीचं दीरासोबत प्रेमप्रकरण सुरु झालं. पती जेव्हा दुबईहून परतला, तेव्हा पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. अचानक एक रात्री पत्नी आणि चुलत दीर रोमान्स करताना पकडले गेले. त्यानंतर कुटुंबीय, गावातील लोक आणि पतीने त्याच्या पत्नीचं लग्न तिच्या चुलत दीरासोबत लावलं. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या गाजीपूरच्या कासिमाबाद तहसिलच्या इंदौर गावात घडली. प्रमोद असं त्या पतीचं नाव असून त्याला एक मुलगी आहे. घरातील आर्थिक स्थिती लक्षात घेता प्रमोद पैसे कमावण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी दुबईला गेला. त्याने पत्नी आणि आईला अडीच वर्ष कमावलेले पैसे पाठवले. सर्व काही ठीक चाललं होतं.

रात्री बारा वाजता महिला घराबाहेर पडली अन् घडलं..

पण प्रमोद दुबहून परत आला. त्यानंतर प्रमोदला पत्नीचा स्वभाव बदलल्याचं कळलं. पत्नी त्याच्यासोबत बोलत नव्हती. प्रमोद जेव्हा बोलायचा प्रयत्न करायचा, तेव्हा ती तब्येत बिघडली आहे, असं सांगायची. जवळपास एक आठवड्यापूर्वी प्रमोद, त्याची पत्नी आणि मुलगी रुममध्ये झोपले होते. त्याचदरम्यान, रात्री बारा वाजताच्या सुमारास प्रमोदची पत्नी घराबाहेर पडली. तिला घराबाहेर पडताना प्रमोदच्या आईनं पाहिलं. सून तिच्या चुलत दिरासोबत रोमान्स करत असल्याचं तिने पाहिलं. त्यानंतर तिच्या सासूने प्रमोदला घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. 

हे ही वाचा >> मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? रेल्वे विभागाचा मोठा निर्णय...

हे सर्व प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्यात एक बैठक झाली. पंचायतमध्येही प्रमोदच्या पत्नीनं तिचा चुलत भाऊ समीरसोबत राहण्याचं म्हटलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय, गावातील लोक आणि प्रमोदने तिचं लग्न समीरसोबत जुळवणं उचित समजलं. त्यानंतर दोघांचही लग्न लावण्यात आलं. लग्नाच्या चार दिवसानंतर महिलेनं तलावात जीव देण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्या महिलेला पाहिलं आणि तिचा जीव वाचवला.

हे ही वाचा >> श्रावणात नॉनव्हेज आणि दारू का सोडतात, एवढं जरूर काय असतं यामध्ये?

त्यानंतर गावात पुन्हा एकदा बैठक झाली. त्या बैठकीत समजलं की, समीरला आता त्या महिलेला त्याच्यासोबत ठेवायचं नव्हतं. पण दोघांनीही एकत्रित राहावं, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याचदरम्यान, पहिला पती प्रमोदनेही कायदेशीरपणे घटस्फोट घेण्याचं बैठकीत म्हटलं. त्यानंतर समीर आणि ती महिला एकमेकांच्या सोबत राहण्यास तयार झाले. महिला तिच्या मुलीली सोबत घेऊन गेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp