बॉयफ्रेंडनं महिलेला OYO हॉटेलमध्ये नेऊन चाकूनं केले 17 वार, कारण ऐकूण हादरून जाल

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं बॉयफ्रेंड तरुणाला अफेयर करणार नसल्याचं सांगितले, यामुळे आठ वर्षे लहान बॉयफ्रेंडने महिलेवर OYO हॉटेलच्या एका खोलीत धारदार शस्त्राने सपासप वार केलेत. ही घटना 6 ते 7 जूनच्या दरम्यान मध्यरात्री बंगळुरूतील सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

ADVERTISEMENT

crime news boyfriend took woman to OYO hotel and stabbed her 17 times What's Matter
crime news boyfriend took woman to OYO hotel and stabbed her 17 times What's Matter
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अवैवाहिक संबंधामुळे महिलेवर OYO हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने वार

point

कारण ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

Crime News : आपल्याला उशीर आलेलं शहाणपण योग्य असतं असे आपण म्हणत असतो. मात्र, वेळीच आलेलं शहाणपण हे उशीरा आलेल्या शहाणपणापेक्षा कधीही चांगलंच असतं. तुम्ही म्हणत असाल की असं का बोललं जातंय? त्याचं कारणंही तसंच आहे. एका महिलेनं बॉयफ्रेंड तरुणाला अफेयर करणार नसल्याचं सांगितले, यामुळे आठ वर्षे लहान बॉयफ्रेंडने महिलेवर OYO हॉटेलच्या एका खोलीत धारदार शस्त्राने सपासप वार केलेत. ही घटना 6 ते 7 जूनच्या दरम्यान मध्यरात्री बंगळुरूतील सुब्रमण्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 

हेही वाचा : 30 वर्षानंतर 'नवपंचम राजयोग' ऑगस्ट महिन्यात येणार, 'या' राशीच्या लोकांना श्रीमंत करुन जाणार

जर महिलेनं तरुणाला आधीच होकार दिला नसता तर आज तिच्यावर ही वेळ आलीच नसती. दरम्यान, संबंधित प्रकरणात आता आरोपीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या महिलेचं नाव हे हरिनी असून तिचे वय वर्षे हे 33 आहे. महिला विवाहित असून तिला 2 अपत्यही आहेत. तर तिच्या बॉयफ्रेंडचं नाव हे यशस असून तो 25 वर्षांचा होता. 

घटनेचा घटनाक्रम

हरिनीने आपल्या बॉयफ्रेंडला इथून पुढे विवाहबाह्यसंबंध करणार नसल्याचं सांगितलं. त्यावेळी यशने चाकूने महिलेवर एक दोन नाही, तर सपासप 17 वेळा वार केले आहेत. दोन दिवसांनंतर हॉटेलच्या रुममध्ये हरिनाचा मृतदेह सापडला. हरिनी यशस हे दोघेही केनगिरी भागातील रहिवासी होते. दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

एका वर्षापासून होते ओळखीचे

हरिनी आणि यशस हे एकमेकांना एका वर्षांपासून ओळखतात. पण मागच्या दोन महिन्यांपासून हरिनी यशसला टाळण्याचा प्रयत्न करत होती. हरिनी यशसोबतची मैत्री संपवून लांब जाऊ इच्छित होती, यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने चाकूने भोकसून तिची हत्या करण्यात आली, या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा : पुण्यात डिजिटल अरेस्ट स्कॅमचा कहर; पाच महिन्यांत 9.21 कोटींची फसवणूक, 'हे' लोक टार्गेट

महिलेला परपुरुषासोबत अवैवाहिक संबंध ठेवणे जीवावर बेतलं आहे. संबंध ठेवण्यास तिने सुरूवातीलाच नकार दिला असता तर तिच्यावर ही वेळ आली नसती. त्यामुळे उशीरा आलेल्या शहाणपणापेक्षा, लवकर आलेलं शहाणपण कधीही योग्य असतं, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp