Devendra Fadnavis: 'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पवारांबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई तक

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: 'शरद पवार यांनाही असं लक्षात आलंय की, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे.' असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या सभेत केलं आहे.

ADVERTISEMENT

'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..'
'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..'
social share
google news

Lok Sabha Election 2024 Devendra fadnavis and Sharad Pawar: अहमदनगर: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी आता चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सुरू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये अहमदनगर हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात प्रचारासाठी आलेले भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हटलं की, 'शरद पवार यांनाही असं लक्षात आलंय की, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे.' (lok sabha election 2024 pawar has also realized that it is time to close the shop talking about sharad pawar devendra fadnavis big statement)

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांनी पक्ष विलिनीकरणाबाबत जे विधान केलं होतं त्याचाच धागा पकडून देवेंद्र फडणवीसांनी 'पवार साहेबांना समजलंय दुकान बंद करण्याची वेळ झालीए.' हे वक्तव्य केलं. 

'दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पाहा फडणवीस शरद पवारांबाबत नेमकं काय म्हणाले..  

'उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एक विकासाचं काम ते दाखवू शकत नाही. निवडणुकीचं वारं कुठे चाललंय हे आता तुम्ही लक्षात घ्या. परवा शरद पवार साहेबांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, या निवडणुकीनंतर सगळे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस पक्षात विलीन होणार आहे.' 

हे ही वाचा>> Priyanka Chaturvedi : 'श्रीकांतच्या कपाळावर लिहलंय, माझा बाप गद्दार...';

'हे मी नाही म्हटलं.. पवार साहेबांनी सांगितलं, याचा अर्थ त्यांनाही वारं लक्षात आलंय. त्यांनाही लक्षात येतंय की, दुकान बंद करायची वेळ झालेली आहे. त्यांनाही लक्षात येतंय की, त्यांच्या पक्षाला या ठिकाणी काही उरलेलं नाही. त्यामुळे तेही आता काँग्रेसमध्ये जाणार आणि सोबत उद्धव ठाकरेंनाही घेऊन जाणार.' 

'यांचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार.. हे आता स्पष्टपणे दिसतंय. यांच्या पायाखालची वाळू सरकलीय.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp