Lok Sabha Election 2024: कुठे उमेदवार बदलले, कुठे माघार घेतली.. 'वंचित'वर का आली अशी वेळ?

निलेश झालटे

VBA: वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची घोषणा केली पण त्यानंतर किती ठिकाणी माघार घेतलीय? कुठे उमेदवार बदलले? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Prakash Ambedkar VBA: मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. मात्र, मागील निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व जाती-धर्मातील प्रतिनिधींना निवडणुकीच्या मैदानात संधी देण्याचं काम वंचित आणि प्रकाश आंबेडकरांकडून केलं जातंय. प्रत्येक समाजघटकाला प्रतिनिधीत्त्व मिळावं ही त्यामागची त्यांची भावना. आणि त्यामुळं अगदी उमेदवाराच्या जातीसह त्याच्या नावाची घोषणा करण्याचा वंचितचा पॅटर्न चर्चेत आला. (lok sabha election 2024 where did the candidates change where did they withdraw why did prakash ambedkar vanchit bahujan aghadi party come to this time)

लोकसभा निवडणुकीत वंचितचं नेमकं चाललंय काय?

2024च्या लोकसभा निवडणुकासाठी आतापर्यंत जवळपास 35 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली तर सहा ठिकाणी इतर उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांमुळं वंचितचं नक्की चाललंय काय? यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खासकरुन सोशल मीडियावर यावरुन खूप जास्त प्रमाणात चर्चा होतेय, सोबतच वंचितवर बी टीम असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितकडून देखील उत्तर दिली जात आहेत. मात्र वंचितनं उमेदवारांच्या घोषणेनंतर खरंच किती ठिकाणी माघार घेतलीय? कुठे उमेदवार बदललेत? कुठे इतर पक्षाला पाठिंबा दिलाय? कुठल्या उमेदवारावरुन वाद निर्माण झालाय? याबाबत आपण सविस्तपपणे जाणून घेऊयात... 

हे ही वाचा>> फडणवीसांच्या जवळचा नेता पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

वंचितच्या उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात पुण्यापासून करुयात... पुण्यातून अभिजीत वैद्य यांना उमेदवारी द्या असं आंबेडकरांनी जागावाटपाची कसलीही चर्चा सुरु नसताना म्हटलेलं, मात्र शेवटी उमेदवारी कुणाला दिली तर मनसेतून आयात केलेले डॅशिंग नेते वसंत मोरेंना. यावरुन सोशल मीडियात बऱ्याच चर्चा रंगलेल्या.

शिरुरमध्ये मंगलदास बांदल तिकीट जाहीर केलं होतं. बारामतीमधून पक्षाने उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षविरोधी भूमिका बांदल यांनी घेतली होती, असा ठपका त्यांच्यावर ठेवत वंचितनं नंतर त्यांची उमेदवारी रद्द केली. नंतर बांदल यांनी महायुतीच्या मंचावर जाऊन भाषणं देखील दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp