Uddhav Thackeray : 'त्या' विधानामुळे 'मविआ'त धस्स्स! ठाकरेंनी अखेर सोडलं मौन!

भागवत हिरेकर

Uddhav Thackeray PM Modi : पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात संशय कल्लोळ निर्माण झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करावी लागली...

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Uddhav Thackeray on PM Modi Statement : नेत्यांच्या विधानांचे कधी काय अर्थ लावले जातील आणि त्यामुळे त्याचा पक्षातील कार्यकर्ते आणि मित्रपक्षांत पडसाद उमटतील, सांगता येत नाही. याचीच प्रचिती गेल्या दोन-तीन दिवसांत आली. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केले. त्यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्षाच्या मनातही धस्स्स झालं. दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं आणि मविआत निर्माण झालेला संभ्रम दूर केला. मोदींच्या विधानामुळे नेमकं काय घडलं आणि ठाकरेंना खुलासा का करावा लागला, हेच जाणून घ्या... (I will not go with BJP, said Uddhav Thackeray while talking about Prime Minister Modi's statement)

"बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा (उद्धव ठाकरे) मानसन्मान करेनच... ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन", असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. 

मोदींच्या विधानाची जोरदार चर्चा!

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदींनी केलेल्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जाणार नाही, हे कसं शक्य होतं. झालंही तसंच. मोदींच्या विधानाची सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे परत भाजपसोबत जाऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यालाही हवा मिळाली. तिसऱ्या टप्प्यातील मतदान तोंडावर असताना अचानक असं सगळं सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. पण, त्यावर अखेर ठाकरेंनी पडदा टाकला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

अलिबागमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. या सभेत त्यांनी मोदींनी केलेल्या विधानावर भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्राने त्यांना ४१ खासदार दिले. एवढे करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. आणि आता अफवा पसरवताहेत... मध्येच त्यांना काय प्रेम आले, देव जाणो. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं... अरे आणून बघा... माझं हे (सभेतला उपस्थित लोकांकडे हात करत) सुरक्षा कवच माझ्यासोबत आहे. मोदीजी, तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही."

    follow whatsapp