Vijay Wadettiwar : "देशद्रोही निकमांनी ही गोष्ट लपवली", वडेट्टीवारांच्या विधानाने मोठा वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vijay Wadettiwar Ujjwal Nikam : हेमंत करकरे यांचा मृत्यू अजमल कसाबच्या बंदुकीतील गोळीने नव्हे, तर पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला होता, असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केला.

social share
google news

Vijay Wadettiwar Ujjwal Nikam : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजबल कसाब, हेमंत करकरे यांच्या उल्लेख करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान केले. त्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. वडेट्टीवार यांनी निकम यांना देशद्रोही म्हटले आहे. (Vijay Vadettiwar has criticized that Ujjwal Nikam is a traitor)

विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, "काही प्रश्न जे आहेत की, ज्या उज्ज्वल निकमांनी बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. ती हकिकत नव्हती कसाबला बिर्याणी दिल्याची. कसाबला कुणी बिर्याणी देईल का? उज्ज्वल निकमने ते नंतर मान्यही केलं. असा बेईमान माणूस आहे तो. हा कसला वकील. हा देशद्रोही आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा >> अजित पवारांनी मिशा काढायची तयारी ठेवावी -श्रीनिवास पवार 

"यांनी जे मांडले, ते पुरावे द्यायला पाहिजे होते. ज्यावेळी आमच्या हेमंत करकरेंचा खून झाला. ती गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कुठल्या अतिरेक्याचीही नव्हती. ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्याची होती, आरएसएस समर्पित. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

त्यावेळी हे पुरावे लपवले. हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल, तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर तिकीट भाजप देत असेल,तर मात्र, हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का? हा प्रश्न येतो. 

वडेट्टीवारांनी नंतर काय केला खुलासा?

कोल्हापूर येथे वडेट्टीवार यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, "मी निकम यांच्याबद्दल जे बोललो ते एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला होता. ते सत्य आहे. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. पुस्तकावर बंदी नाहीये. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, हेमंत करकरेंचा खून अतिरेक्यांच्या बंदुकीतून झालेला नाही. तपासात हे समोर आलेलं आहे. मग ही बाजू कोर्टासमोर का मांडली नाही, असे मुश्रीफांनी म्हटले आहे. तेच मी बोललो. हे अनेक वृत्तपत्रांनी त्यावेळी छापले होते. यात लपवण्यासारखे काहीही नाही."

'निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी...', भाजपची टीका

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

ADVERTISEMENT

"विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला", असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >> "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट 

"निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपालाविरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा", असे बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांना सुनावले.

हेही वाचा >> "लोक फोन करून सांगताहेत की, भाजपला नाही 'नोटा'ला मत देणार" 

"जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही", असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT