Sonia Gandhi यांनी बोलावली UPA ची बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी चार वाजता एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीसाठी चार राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन अशी ही चार नावं आहेत.

भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासोबत जात सत्ता स्थापन केली. आता उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने येत्या काळात शिवसेना हा युपीएचा म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटकपक्ष होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. इतकंच नाही तर आता आगामी काळात भाजपसोबत युती होण्याच्या सगळ्या शक्यता धूसर झाल्या आहेत का? असाही प्रश्न चर्चिला जातो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Opposition March : ‘आम्हाला पाकिस्तानाच्या सीमेवर असल्यासारखं वाटत होतं’

काय म्हणाले संजय राऊत?

ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे काही संसदेत घडलं त्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर आणि भाजपवर टीकेचे ताशेरे ओढळे आहेत. खासदारांना नियंत्रणात आणण्यासाठी इतके मार्शल्स बोलवण्यात आले होते मोदी आम्हाला घाबरवू इच्छितात का? असा प्रश्न संजय राऊत यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विचारला. एवढंच नाही तर विरोधकांची आता एकजूट झाली आहे असंही महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २० तारखेला म्हणजेच आज बोलावलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालावरून मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात भांडण झालं. हे सगळं इतकं टोकाला गेलं की दोन्ही पक्षांमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर शिवसेना केंद्रात असलेल्या NDA मधूनही बाहेर पडली. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असा अभूतपूर्व वेगळा प्रयोगही झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत काय घडणार? सोनिया गांधी काय सूचना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या बैठकीत उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी होत असल्याने आता शिवसेना UPA मध्ये सहभागी होणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT