NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस
NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं हे सगळ्यांना माहित आहे. मी त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया देऊन नवाब मलिक यांच्या जखमेवरची खपली काढणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन NCB वर निशाणा […]
ADVERTISEMENT

NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं हे सगळ्यांना माहित आहे. मी त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया देऊन नवाब मलिक यांच्या जखमेवरची खपली काढणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन NCB वर निशाणा साधला, तसंच भाजपवरही आरोप केले. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..
नवाब मलिक यांनी NCB आणि भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत?
‘राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत. गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.’