कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर... - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…
बातम्या

कोरोना गेलाय अशा थाटात वागू नका, नाहीतर…

मुंबई: कोरोना या साथीच्या आजारामुळे गेल्या वर्षभरापूर्वी संपूर्ण जगावर एक अत्यंत भयंकर असं संकट आदळलं. साध्या सर्दी-खोकल्याने सुरुवात होणाऱ्या या साथीच्या आजाराने जेव्हा लोकांचं प्राण जाणं सुरु झालं, तेव्हा सरकारला देखील या संकटाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिलं. मार्च 2020 या महिन्यात सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. यावरुन परिस्थिती किती गंभीर होती हे आपल्या आजवर लक्षात आलं असेलच. पण लॉकडाऊन केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम हे आर्थिक पातळीवर जाणवू लागले. म्हणूनच साधारण सप्टेंबर 2020 पासून हळूहळू काही निर्बंध हटविण्यात आले. दरम्यान, गेल्या काही काळात कोरोनाची रुग्ण संख्या ही बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली होती. त्यामुळे सरकारने आणि विशेषत: राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टींवरील निर्बंध हटवले. त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार हे पुन्हा सुरु झाले. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही अनपेक्षितरित्या वाढू लागली आहे. आज जर आपणही आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लोकं ही कोरोनाबाबत फारशी काळजी घेत नसल्याचं दिसतं आहे. हीच गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे.

‘कठोर निर्णय घ्यावे लागतील…’

‘कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. लोक मास्क वापरत नाही. याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, त्यामुळे आताच याचा गांभीर्याने विचार करा. अथवा आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. हे सगळं काळजी वाढवणारे आहे, उद्या मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे, काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अनेक देशात रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाउन करायला लागलं आहे. सध्या आपल्याकडील रुग्णवाढ ही देखील गंभीर आहे. त्यामुळे लोकांनी आता कठोर निर्णयाची मानसिकता ठेवावी. कारण कोरोना वाढ गंभीर आहे.’ अशी चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. याचाच अर्थ राज्यातील कोरोनाशी निगडीत परिस्थिती फारशी चांगली नाही हे अधोरेखित झालं आहे.

हे जरुर वाचा: कोरोना लसीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही का?

निर्बंध हटवले आणि निष्काळजी वाढली

राज्यात गेल्या काही महिन्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध ठेऊन सर्वांसाठी लोकल प्रवास देखील सुरु केला होता. मात्र, आता गेल्या काही दिवसात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक जण हे कोरोना साथीचा आजार अस्तित्वात नसल्यामप्रमाणे वागत आहेत. अनेक जण हे मास्कही न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहे. याच निष्काळजीपणामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

भ्रमात राहू नका…

सुरुवातीला कोरोना हा साथीचा आजार भयंकर आहे याची जाणीव लॉकडाऊनमुळे सर्वांनाच झाली होती. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले तसतसे प्रत्येक जण कोरोनाबाबत अधिकच निर्धास्त होऊ लागला. जी अत्यंत गंभीर बाब आहे. कोरोना आता राहिलेला नाही अशीच अनेकांची आता धारणा झाली आहे. पण कोरोना अद्यापही पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. तसंच यावरील लस जरी बाजारात आली असली तरीही ती फार मर्यादित स्वरुपात असल्याने प्रत्येकापर्यंत पोहचण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. अशावेळी कोरोनापासून दूर राहण्यासाठी फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचाच वापर करावा लागणार आहे.

ही बातमी जरुर पाहा: चिंताजनक, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले!

यापूर्वी अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळाली आहे. पण आपल्याकडे लस आल्यामुळे आता कोरोना दुसरी लाट येणारच नाही अशा संभ्रमात कुणीही राहू नये. कारण हा आजार अतिशय चोर पावलाने येतो. त्यामुळे याविषयी सतर्क राहणं आणि अधिकाधिक स्वच्छता पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे.

जर यापुढे देखील राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही वाढतच राहिली तर सरकार पुन्हा काही कठोर नियम लागू करु शकते. जे आपल्याला आता खरोखरच परवडण्यासारखे नाहीत. कारण की, अद्यापही आपली अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली नाही. अशावेळी कोरोनाला दूर ठेवणं हेच आपल्या हिताचं आहे. त्यामुळे थोडा विचार करा आणि कोरोनापासून थोडं सावध राहा. कारण सध्या काळ कठीण आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक