होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

मुंबई तक

‘कंत्राटी कामगाराप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. किती काळ पदावर राहणार हे त्यांनाच माहिती नाहीये’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सभागृहात भाषणं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘कंत्राटी कामगाराप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. किती काळ पदावर राहणार हे त्यांनाच माहिती नाहीये’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सभागृहात भाषणं केलेल्या आमदारांनाही उत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी काय दिलं प्रत्युत्तर?

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या विधानालाही शिंदेंनी उत्तर दिलं. ‘होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रु पुसण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं कंत्राट मी घेतलं आहे. त्यामुळे असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा”, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;’ सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

एकनाथ शिंदे अजित पवारांना म्हणाले, ‘सरकार येऊन दीड महिनाच झालाये’

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी गुन्हेगारीवाढीकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. पण भारतात भौगोलिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण इंडियाच्या अहवालानुसार गुन्हेगारीत देशात अकरावा क्रमांक आहे. आमचं सरकार येऊन दीड महिनाच झाला आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp