महाराष्ट्रातल्या मास्क सक्तीबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

मुंबई तक

देशात कोरोनाचे सक्रिय रूग्ण वाढत आहेत. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मास्क सक्कीबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले आहेत राजेश टोपे? “देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. मात्र राज्यात तूर्तास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात कोरोनाचे सक्रिय रूग्ण वाढत आहेत. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मास्क सक्कीबाबत राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

“देशात कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. मात्र राज्यात तूर्तास काही काळजीचं कारण नाही. मात्र ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी मास्क सक्ती पुन्हा सुरू करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते निर्णय घेतील.” असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे. एवढंच नाही तर काळजी घेण्याचं आणि दुर्लक्ष न करण्याचंही आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp