गाडी नको घोडा घ्या, काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आगळंवेगळं आंदोलन

मुंबई तक

अमरावाती: केंद्र सरकारने वारेमाप करवाढ करून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना देखील पेट्रोल आणि डिझेलच्या करात अवास्तव वाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे कारस्थान केंद्र सरकारने चालवले आहे. त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात आज युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांनी थेट घोड्यावर बसून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावाती: केंद्र सरकारने वारेमाप करवाढ करून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना देखील पेट्रोल आणि डिझेलच्या करात अवास्तव वाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे कारस्थान केंद्र सरकारने चालवले आहे. त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात आज युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांनी थेट घोड्यावर बसून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.

पेट्रोल आणि डिझेल आता सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे राहिले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने पुन्हा एकदा घोडा हाच सर्वसामान्यांचे वाहन बनणार असल्याचा म्हणत सागर देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अमरावतीतील राजकमल चौक येथून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून स्वारी करत शहरातील विविध पेट्रोल पंप तसेच चौकात उभे राहून केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्ता केला आहे. ठिकठिकाणी निदर्शने करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोंदवित नागरिकांना जागृत होण्याचा संदेश दिला.

आता सरकारला पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा अधिकार नाही– फडणवीसांचा टोला

हे वाचलं का?

    follow whatsapp