बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो वाझेने केलेले आरोप धादांत खोटे: अनिल परब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मी बाळासाहेब आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझेने माझ्यावर केलेले आरोप हे धादांत खोटे आहे. सरकारची बदनामी करण्यासाठीच असे आरोप केले जात आहे.’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अनिल परब यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं आहे.

‘मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपचे नेते सांगत आहेत की, तिसरी विकेट पडणार. याचाच अर्थ गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून हे कारस्थान शिजवलं जात आहे. सचिन वाझे सध्या NIA च्या ताब्यात आहे. अशावेळी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरुन भाजप राज्यातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. एवढंच काय तर माझी नार्को टेस्ट केली तर मी त्याच्यासाठी देखील तयार आहे.’ असं म्हणत अनिल परब यांनी या संपूर्णं प्रकरणात आता भाजपवर निशाणा साधला आहे.

पाहा नेमकं काय म्हणाले अनिल परब:

‘बाळासाहेब आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आज सचिन वाझे यांनी एनआयएला कोर्टात पत्र दिलं. या पत्रात उल्लेख केला आहे की, मी सचिन वाझेंना बोलावलं होतं आणि त्यावेळी मी SBUT च्या ट्रस्टींना 50 कोटी रुपये घेऊन बोलावलं होतं. तर दुसरा आरोप असा आहे की, जानेवारी 2021 मध्ये मी मुंबई महापालिकेच्या 50 कंत्राटदारांकडून 2-2 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत. मी बाळासाहेबांची आणि माझ्या दोन मुली आहेत ज्या मला अत्यंत प्रिय आहेत त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, हे आरोप धादांत खोटे आहेत.’ असं म्हणत अनिल परबांनी सर्व आरोप नाकारले आहेत.

Sachin Vaze यांच्या कथित पत्रामुळे खळबळ, पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावं

ADVERTISEMENT

‘हे भाजपने तयार केलेलं प्रकरण आहे’

ADVERTISEMENT

‘हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केले गेलेले आरोप आहेत. गेले दोन-तीन दिवस भाजपचे पदाधिकारी आरडाओरड करत होते की, आम्ही या प्रकरणात तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलेलं, काही दिवसापासून त्यांना प्रकरणाची कल्पना आहे किंवा सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे आज पत्र देणार होता याची कल्पना त्यांना अगोदरपासूनच होती. म्हणून ते याबाबतचा आधीपासून गाजावाजा करत होते. याचा अर्थ केंद्रीय यंत्रणेला हाताशी घेऊन सचिन वाझेने आरोप केले आहेत.’ असं म्हणत अनिल परबांनी भाजपवरच निशाणा साधला आहे.

सचिन वाझेच्या भावाची प्रतिक्रिया, पाहा कोर्टाकडे काय केली मागणी

‘माझी नार्को टेस्टसाठी देखील तयारी आहे’

‘वाझेने केलेल्या दोन्ही आरोपांशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे. हा एक भाजपच्या स्ट्रॅटर्जीचा भाग आहे. म्हणून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. अगदी माझी नार्को टेस्ट देखील करावी. एनआयएने जरी चौकशी केली तरी मी त्यासाठी तयार आहे. खरं तर एनआयए हे स्फोटकाचा तपास करत आहे. पण त्याबाबत काहीही समोर आलेलं नाही.’ असंही ते यावेळी म्हणाले.

‘सचिन वाझेने आधीच याबाबत आरोप का केले नाही?’

‘मी बिलकूल राजीनामा देणार नाही. कारण मी कोणतंही पाप केलेलं नाही. त्यामुळे मला चौकशीला बोलवा. मी जर दोषी असेल तर माझे पक्षप्रमुख मला फासावर लटकवतील. प्रश्न हा की, त्या लोकांनी असे लेटरबॉम्ब टाकायचे आणि आम्ही अशाप्रकारे राजीनामे द्यायचे हा त्यांचा उद्देश आहे. मला एक सांगा ते म्हणाले की, मी गेल्या वर्षी आणि जानेवारीमध्ये त्यांना बोलावलं होतं. तर मग ते एवढे दिवस गप्प का होते? परमबीर सिंग यांच्या पत्रात देखील माझ्या नावाचा काहीही उल्लेख नव्हता. त्यामुळे् हे सगळं भाजपने रचलेलं कारस्थान आहे.’ असा प्रत्यारोप अनिल परब यांनी केलं आहे.

आता अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप त्यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता पुन्हा एकदा याच प्रकरणावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT