महाराष्ट्रात दिवसभरात 3187 नवे कोरोना रूग्ण, 49 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 3187 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 3253 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 68 हजार 530 रूग्णांना डिस्चाज् देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.26 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 88 लाख 84 हजार 819 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 47 हजार 793 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 52 हजार 309 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 1453 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर आज राज्यात 36675 सक्रिय रूग्ण आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या

20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते. आज समोर आलेली रूग्णसंख्या यापेक्षाही कमी आहे. 2432 रूग्ण दिवसभरात पॉझिटिव्ह आहेत हे आरोग्य विभागाने म्हटलं आहे. मागच्या सात महिन्यातली ही दुसरी निचांकी संख्या आहे.

ADVERTISEMENT

राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार

ADVERTISEMENT

राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच चित्रपटगृह आणि नाट्यगृह यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

Covid 19: ‘कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक’

राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागाने यासंबंधी नियोजन केलं होतं. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. तर शहरी भागात आठवी ते १२वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय

राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT