Maharashtra Crisis: "त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण..." - Mumbai Tak - maharashtra supreme court hearing today supreme court hearing on maharashtra today live uddhav thackeray vs eknath shinde - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra Crisis: “त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण…”

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंच्या झोळीत टाकलं असलं, तरी कायदेशीर लढाई सुरूच आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनात्मक पेचात अडकला असून, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना महेश जेठमलानी यांनी काही मुद्दे […]
Updated At: Mar 26, 2023 21:57 PM

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंच्या झोळीत टाकलं असलं, तरी कायदेशीर लढाई सुरूच आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनात्मक पेचात अडकला असून, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना महेश जेठमलानी यांनी काही मुद्दे मांडले.

सुप्रीम कोर्टात पाच सदस्यीय घटनापीठासमोर नबाम रेबिया निकालाचा पुर्नविचार करण्यासाठी प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचं का यावर सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना वकील महेश जेठमलानी म्हणाले, “नबाम रेबिया निकालाचा प्रश्न तेव्हाच उद्भवतो जेव्हा व्हिपचं पालन केलं जात नाही. 25 जून 2022 रोजी विधानसभेच्या उपाध्यक्षांनी नोटीस बजावली. 16 आमदारांना समन्स बजावण्यात आलं. त्यांना (शिवसेनेतील बंडखोर आमदार) 14 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आलं. यात अपात्र करण्याचा उल्लेख कुठेही केला गेलेला नाही. यात कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालाय, तो अपात्र करण्याच्या प्रक्रियेबद्दल. अजूनपर्यंत ते (ठाकरे गट) फक्त 16 आमदारांबद्दलच बोलत आहेत”, असं जेठमलानी यांनी कोर्टाला सांगितलं.

ठाकरेंना भिडणं भिडेंना भोवलं; कोर्टानं ठोठावला मोठा दंड

जेठमलानी पुढे म्हणाले, “त्यांच्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात कुठेही इतर 23 आमदारांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. अशा प्रकारे न्यायालयाची दिशाभूल केली जात आहे. त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण त्यांना दोन गटात फूट पाडायची होती. 16 जणांना नोटीस बजावली कारण हा आकडा बहुमताला धक्का पोहोचवणारा नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत ते 16 आमदारांबद्दलच बोलत होते. जेव्हा नवीन सरकार आलं तेव्हा ते 39 आमदारांबद्दल बोलायला लागले. 27 जून 2022 रोजी अपात्रतेसाठी नोटीस दिली गेली, पण इतरांना दिली गेली नाही, असं जेठमलानी यांनी कोर्टात सांगितलं.

…तर देवच देशाचे रक्षण करो,’ जेठमलानी काय म्हणाले?

“विधानसभेने तयार केलेले नियम पाळण्याची गरज नाही, असे म्हणणे विधानसभेला शोभत नाही आणि तसे असेल तर देव देशाचे रक्षण करो. एका आमदारांचं कार्यालय जाळण्यात आलं, आमदारांना धमक्या दिल्या. त्यामुळे आम्ही संरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात आलो, असा युक्तिवाद जेठमलानींनी केला.

“गेल्या वर्षी जूनमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती होती, आमदारांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तुम्ही मुंबईत आलात तर तुम्हाला ठार मारले जाईल, अशा धमक्या दिल्या गेल्या. जीवे मारण्याच्या धमक्या देऊन त्यांना मुंबईत येण्यापासून रोखले, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात आलो,” असं जेठमलानी यांनी कोर्टात सांगितलं.

‘ठाकरेंनी गद्दारी तर..’, सुभाष देसाईंच्या मुलाच्या पक्षप्रवेशानंतर CM शिंदेचा वार

बहुमत गमावल्यामुळेच ठाकरेंनी राजीनामा दिला -शिंदे गट

“राबिया निकालावर जोर देण्याची गरज नाही, कारण बहुमताचा नियम पक्षांतरापेक्षा उच्च आहे. उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सर्व गोष्टींमुळे राजीनामा दिला असे म्हणणे म्हणजे विश्वासार्हतेला नवव्या अंशापर्यंत वाढवण्यासारखं आहे. बहुमत गमावल्याची कल्पना आल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला,” असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने जेठमलानी यांनी केला.

…तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम?