MVA: कसब्याच्या निकालाने महाविकास आघाडी मजबूत केली? भाजपचं टेन्शन वाढणार!

भागवत हिरेकर

Mahavikas Aghadi, Maharashtra Politics: दोन जागांवर पोटनिवडणूक झाली, एक कसबा पेठ आणि दुसरी चिंचवड. मात्र, चर्चा होतेय ती कसबा पेठ पोटनिवडणूक निकालाची. या निकालाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले, तरी महाविकास आघाडीला भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी स्पष्ट मेसेज निकालाने दिला. या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या भूमिका या एकत्र राहण्याच्याच असल्याच्या समोर आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mahavikas Aghadi, Maharashtra Politics: दोन जागांवर पोटनिवडणूक झाली, एक कसबा पेठ आणि दुसरी चिंचवड. मात्र, चर्चा होतेय ती कसबा पेठ पोटनिवडणूक निकालाची. या निकालाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असले, तरी महाविकास आघाडीला भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी स्पष्ट मेसेज निकालाने दिला. या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या भूमिका या एकत्र राहण्याच्याच असल्याच्या समोर आल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी कायम राहिली तर भाजप प्रणित युतीची डोकेदुखी वाढू शकते, असं राजकीय विश्लेषक म्हणताहेत.

लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार?

कसबा पेठचा निकाल लागण्यापूर्वी तिन्ही पक्षातून स्वबळांची विधानं केली जात होती. मात्र, निकालानंतर तिन्ही पक्षाच्या भूमिका महाविकास आघाडी असायला हवी, अशा बनल्या आहेत.

शरद पवार महाविकास आघाडीबद्दल काय म्हणाले?

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी महाविकास आघाडी राहायला हवी, अशीच भूमिका मांडली. ते म्हणाले, “माझा एक प्रयत्न राहणार आहे की, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोर जाणं याची काळजी घेतली जाईल. मी आता महाराष्ट्रात बघतोय की, लोकांना बदल हवाय. महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, त्या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्यात आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील काम करणारे, राष्ट्रवादीचे सहकारी आहेत, काही छोटे पक्ष आहेत. या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत”,

Exclusive: कसब्यात भाजपचा पराभव म्हणजे सगळं संपलं नाही: श्रीकांत भारतीय

हे वाचलं का?

    follow whatsapp