मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना कोर्टाने नाकारला जामीन

मुंबई तक

भाजप आमदार नितेश राणे यांचा नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता नितेश राणे या प्रकरणी हायकोर्टात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजप आमदार नितेश राणे यांचा नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता नितेश राणे या प्रकरणी हायकोर्टात जाणार आहेत असं नितेश राणे यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.

नितेश राणे अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामिनासाठी अर्ज करु असंही त्यांनी म्हटलं आहे.

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. शिवसेना शाखेसमोर शिवसैनिक मोठ्याप्रमाणात जमले आणि त्यांनी फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांना आवाहन केलं आहे. नारायण राणे यांनी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर होण्यास सांगावं, असं वैभव नाईक यांनी म्हटलंय.

नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान नितेश राणे यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच नोटीस बजावून कणकवली पोलीस स्थानकात बोलावलं होतं. पण कामात व्यस्त असल्याचं सांगत नारायण राणे यांनी हजर राहणं टाळलं.

जिल्हा बँक निवडणुकीत फटका?

दरम्यान, सिंधुदुर्गात जिल्हा बँकेची निवडणूक काही दिवसांत होऊ घातली आहे. संतोष परब मारहाण प्रकरणाच्या आधी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातलं राजकारण तापलं होतं. या निवडणुकांसाठी राजकीय नेतेमंडळींनी देखील जोरदार प्रचार सुरू केला असून त्यातच नितेश राणेंचं नाव या मारहाण प्रकरणात आल्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp