महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा.. - Mumbai Tak - one year of maharashtra corona - MumbaiTAK
बातम्या

महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला 9 मार्चला एक वर्षं पूर्ण झालं. पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये राज्यातला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एक वर्षाने इथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर पटसुते यांनी दिली आहे. तर, पहिला रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केलेली, त्यामुळे कर्मचा-यांचं […]

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला 9 मार्चला एक वर्षं पूर्ण झालं. पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये राज्यातला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एक वर्षाने इथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर पटसुते यांनी दिली आहे. तर, पहिला रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केलेली, त्यामुळे कर्मचा-यांचं मनोबल वाढल्याची आठवण इथल्या कर्मचा-यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.

‘बरोबर एक वर्षांपूर्वी आमच्याच नाचडू हॉस्पिटलमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळलेला. पहिल्यांदा भीती देखील वाटली होती. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनकरून चौकशी केली. तेव्हा वाटलं की पंतप्रधान स्वत: फोनकरून आपल्या कामाची दखल घेतील असं कधी वाटलंच नव्हतं. आता जर ते आपल्या पाठीशी आहेत, मग घाबरायची काहीच गरज नाही. त्यांच्या फोन नंतर मोठा दिलासा मिळाला’, असं इथल्या कर्मचा-यांनी सांगितलं.

शिवाय, पहिला रुग्ण इथून बरा होऊन घरी परतला तेव्हा प्रचंड अभिमान वाटल्याची भावना इथल्या ड्रायव्हर आणि अडेंडंट यांनी व्यक्त केली. ‘पहिली व्यक्ती बरी होऊन जात असताना आम्हाला फार आनंद झाला. त्यावर त्या व्यक्तीनेच आमचे आभार मानले. तुमच्यामुळे मी आज एकदम ठणठणीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आम्हालाही भारावल्या सारखं झाल्याचं’, ते म्हणाले.

आता एक वर्षानंतर नायडू हॉस्पिटलमधली नेमकी स्थिती काय याबद्दल बोलताना डॉ. पटसुते म्हणाले की, ‘नोव्हेंबर पर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या जास्तच होती. त्यानंतर दोन – तीन महिन्यांच्या कालावधीत रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे लोकं निश्चिंत झाले. त्यामुळेच आता मार्च महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं चित्रं आहे असं ते म्हणाले. गेल्या वर्षंभरात आम्ही अंदाजे पाच हजार रुग्णांवर उपचार केले. आमच्या सर्व कर्मचा-यांच्या सहकार्याने आम्ही रुग्णांवर योग्य उपचार करू शकलो याचं आम्हाला समाधान असल्याचं’, ते म्हणाले.

हा व्हिडिओ देखील पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 1 =

Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर