कायदेशीर अडचणीत अडकलेले समीर वानखेडे कोपरी पोलीस ठाण्यात दाखल, पोलिसांना म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे कायदेशीर अडचणींमध्ये अडकले आहेत. समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सद्गुरू बार आणि रेस्तराँचं लायसन्सचं हे प्रकरण आहे. समीर वानखेडे आज ठाण्यातल्या कोपरी पोलीस स्टेशनला पोहचले असून ते तिथे त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. समीर वानखेडे यांच्या विरोधात कलम 420, 181, 188, 465, 468, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन प्रकरणांचा जबाब नोंदवण्यासाठी समीर वानखेडे ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत.

समीर वानखेडेंना या प्रकरणात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. ज्यानुसार ते आता जबाब नोंदवण्यासाठी आले आहेत.

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द करण्याचे आदेश आले आहेत. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्काने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या 17 व्या वर्षी नावावर बारचा परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही नोटीस बजावली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भारतीय रेव्हेन्यू सेवेत कार्यरत असलेले आणि एनसीबीचे माजी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे बार परवान्यामुळे अडचणीत आले आहेत. फसवणुकीसह वानखेडेंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र याचिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयानंही खडेबोलही सुनावले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर समीर वानखेडेंविरूद्ध ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणातच ठाणे पोलिसांनी आता समीर वानखेडेंना समन्स बजावलं आहे. २३ फेब्रुवारी रोजी कोपरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हजर न राहिल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. समीर वानखेडे यांच्याविरुद्ध षडयंत्र, फसवणूक, शपथेवर खोटी माहिती देणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांनी 1997 मध्ये बार आणि रेस्तराँचा परवाना घेताना खोटी कागदपत्रं सादर केल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंवर आरोप केला होता की, अवघ्या 17व्या वर्षी त्यांना बारचा परवाना मिळाला होता. नवी मुंबईत असलेला सदगुरू रेस्ट्रो बारचा परवाना हा समीर वानखेडे यांच्या नावावर होता. समीर वानखेडे यांच्या नावावर हा बारचा परवाना झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. अल्पवयीन असतानाही बारचा परवाना कसा मिळाला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने समीर वनाखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT