‘नाईक, राणेंच्या हत्या कशा झाल्या हे राज्याला माहितीये’; वैभव नाईकांचा नितेश राणेंवर पलटवार
नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली गेली होती, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. या आरोपावरून आता आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केला आहे. वैभव नाईक यांनी नितेश राणेंना काय दिलं उत्तर? “याआधी सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या […]
ADVERTISEMENT

नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली गेली होती, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. या आरोपावरून आता आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केला आहे.
वैभव नाईक यांनी नितेश राणेंना काय दिलं उत्तर?
“याआधी सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, शिवसेनेचे कार्यकर्ते गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रला माहिती आहे,” असं आमदार वैभव नाईक म्हणाले.
“नितेश राणे हे आज उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत. खरंतर उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंनी सुद्धा शिवसैनिक संतोष परब हल्ला झाला आणि त्या हल्ल्याच्या सुपारी मागे कोण होता, हे सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावरून लोकांसमोर आलेलं आहे.” हे वैभव नाईक यांनी म्हटलंय.
“एकनाथ शिंदे गट तयार झाल्यानं नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत. पण सुपारीबाज कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू,” असं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणेंना दिलं आहे.
नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर काय केला होता आरोप?
आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत गंभीर आरोप केला होता. नितेश राणेंनी एक ट्विट केलं होतं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच शिवसेना सोडल्यानंतर माझ्या वडिलांना संपवण्यासाठी तथाकथित शांत आणि सभ्य पक्षप्रमुखांकडून सुपारी दिली गेली होती. म्याऊ म्याऊ संपू द्या नंतर आम्ही वस्त्रहरण सुरू करू,’ नितेश राणे यांनी म्हटलं होतं. या सगळ्या आरोपांना वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.