अनैसर्गिक पावसामुळे मुंबईत Landslide, संजय राऊतांकडून BMC ची पाठराखण
रविवारचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यांत वेदनादायी ठरला. मुंबईत माहुल, विक्रोळी, भांडूप, अंधेरी, कांदिवली अशा विविधी ठिकाणी भूस्खलनामुळे झालेल्या अपघातात ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल परिसरात घराची भींत कोसळून १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टीका होत असताना, आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून महापालिकेची पाठराखण करण्यात आली आहे. मुंबईतली दुर्घटनांची दरड ही अनैसर्गिक […]
ADVERTISEMENT

रविवारचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यांत वेदनादायी ठरला. मुंबईत माहुल, विक्रोळी, भांडूप, अंधेरी, कांदिवली अशा विविधी ठिकाणी भूस्खलनामुळे झालेल्या अपघातात ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल परिसरात घराची भींत कोसळून १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टीका होत असताना, आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून महापालिकेची पाठराखण करण्यात आली आहे.
मुंबईतली दुर्घटनांची दरड ही अनैसर्गिक पावसामुळे कोसळली. काहीही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं अशा शब्दांत शिवसेनेने टीकाकारांना उत्तर दिलंय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.
Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट! पालघर, ठाणे, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा
जाणून घेऊया काल झालेल्या दुर्घटनांमध्ये कोणत्या ठिकाणी किती जणांनी आपले प्राण गमावले-