अंधेरी पोटनिवडणूक : अखेर उद्धव ठाकरेंनी घेतलं राज ठाकरेंचं नाव, भाजपचे मानले आभार!
अंधेरी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतून भाजपनं माघार घेतली अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पण, भाजपनं माघार घेण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलं होतं. पहिले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मात्र उद्धव ठाकरेंनी फक्त पवारांचे आभार मानले. त्याची चर्चा […]
ADVERTISEMENT

अंधेरी पोटनिवडणुकीच्या निवडणुकीतून भाजपनं माघार घेतली अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पण, भाजपनं माघार घेण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलं होतं. पहिले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दुसरे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मात्र उद्धव ठाकरेंनी फक्त पवारांचे आभार मानले. त्याची चर्चा झाली, पण आता ठाकरेंनी राज ठाकरेंचं नावही घेतलंय आणि भाजपचे आभारही मानलेत.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोधी करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन सर्वपक्षीयांना केलं.
पवारांनी आवाहन केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनातून ठाकरेंनी फक्त शरद पवारांचेच आभार मानले आणि राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मात्र एका शब्दातही उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे ठाकरेंच्या या निवेदनाची चर्चा झाली.
Andheri Bypoll : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या निर्णयाबाबत म्हणाले, “महाराष्ट्राची परंपरा…”
उद्धव ठाकरेंनी आधी राज ठाकरेंचं नाव घ्यायला टाळलं, मात्र अखेर त्यांच्याकडून मनसे प्रमुखांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. सामनाचे संपादक असलेल्या उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखात शरद पवारांबरोबर राज ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केलाय.
शरद पवारांबरोबर राज ठाकरेंचा उल्लेख
सामना अग्रलेखात म्हटलंय की, ‘निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री. शरद पवारांपासून राज ठाकरे यांनी फडणवीसांना विनम्र आवाहन केले व शेवटी भाजप नेत्यांनी म्हणे दिल्लीशी चर्चा करून अंधेरीतील उमेदवार मागे घेतला.’
भाजपनं पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोणताही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र सामना अग्रलेखातून माघार घेण्याच्या भूमिकेबद्दल आधार मानण्यात आलेत. असं असलं तरी भाजपचं उल्लेख न करता आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Andheri Bypoll: भाजपला माघार घेण्यासाठी मागच्या दाराने विनंती कुणी केली? फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
भाजपचे आभार, सामनात ठाकरेंनी काय म्हटलंय?
अग्रलेखात म्हटलंय की, ‘भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्जात अनेक गफलती समोर आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद होण्याचा धोका होता. या धोकादायक वळणावर भाजप आणि मिंधे गटाच्या गाडीस अपघात होणारच होता. त्या धोक्यातून सुटका करून घ्यायची म्हणून अचानक गाडीस ब्रेक मारून भाजपने ‘यू टर्न’ घेतला. तरी या निर्णयाबद्दल आम्ही संबंधितांचे आभार मानीत आहोत’, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
देवेंद्र फडणवीसांवर टीका
सामना अग्रलेखातून भाजपच्या टीका करण्यात आलीये. त्याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय घडामोंडीवरून देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागण्यात आलंय. ‘आजच्या माघारीपूर्वी हे कारस्थान संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. फडणवीस यांचे सध्या करूनसवरून नामानिराळे राहण्याचे उद्योग सुरू आहेत’, असं म्हणत या सगळ्या राजकीय घडामोडींमागे फडणवीस होते, असा आरोप सामनातून करण्यात आलाय.