‘आकडेवारी हा जरी विषय असला तरी…’; धनुष्यबाण चिन्हाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

मुंबई तक

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात शिवसेना कोणाची आणि पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु आहे. सध्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हा निर्णय निष्पक्ष व्हावा अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली . ज्यांनी पक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात शिवसेना कोणाची आणि पक्षाच्या चिन्हासाठी लढाई सुरु आहे. सध्या याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हा निर्णय निष्पक्ष व्हावा अशी अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी पक्षाची स्थापना केली . ज्यांनी पक्ष वाढवला, त्यांचा विचार केला जावा, असं अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले, निष्पक्ष निर्णय होणं अपेक्षित आहे

धनुष्यबाण चिन्हांबाबत प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले, यात निष्पक्ष निर्णय होणं अपेक्षित आहे. कारण शेवटी ज्यांनी पक्षाची स्थापना केली, ज्यांनी पक्ष जोपासला, वाढवला, त्यांचा विचार केला जावा. जनभावना लक्षात घेतल्या पाहिजे. आकडेवारी हा जरी विषय असला तरी जनमताचा विचार करून निष्पक्ष निर्णय व्हावा अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण म्हणाले.

शिंदे गटाकडून शुक्रवारी कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे सादर

हे वाचलं का?

    follow whatsapp