डोंबिवली: तीन तरुणांकडून 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण, अपहरणाचं नेमकं कारण काय?
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचं तीन तरुणांनी अपहरण केल्याची घटना डोंबिवलीच्या मानपाडा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. मात्र, डोंबिवलीसारख्या सुस्कृंत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याने डोंबिवलीकरांची चिंता मात्र वाढली आहे. नेमकी घटना काय? डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे एक शिपींग एजंट […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: नोकरी लावण्यासाठी दिलेले पैसे परत न केल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचं तीन तरुणांनी अपहरण केल्याची घटना डोंबिवलीच्या मानपाडा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. मात्र, डोंबिवलीसारख्या सुस्कृंत शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्याने डोंबिवलीकरांची चिंता मात्र वाढली आहे.
नेमकी घटना काय?
डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनजी हे एक शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणांना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले होते. बॅनर्जी यांनी या तीनही तरुणांसाठी श्रीलंकेत काम शोधलं. त्यांचा व्हिसा देखील तयार केला. यासाठी मनजीत याने शुभाशिष बॅनजी यांना दिलेले पैसे खर्च झाले.
या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने तिघांनाही क्वॉरंटाईन करण्यात आलं. हे तीनही तरुण 15 दिवस क्वारंटाईन असल्याने त्यांच्या व्हिसाची मुदत संपली.