शिवसेना नाव आणि चिन्ह आयोगाने हिरावलं, ठाकरेंकडे आता एकच शेवटचा पर्याय…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Group will give a challenge : शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह (shivsena name and symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission of india) एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने (Caveat in supreme court) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. आता उद्धव ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray Group) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाच्या कॅव्हेटला उत्तर म्हणून उद्धव गटाकडून आजच ऑनलाइन अर्ज दाखल केला जाणार आहे. online petition will be filed today on behalf of the Uddhav Thackeray group

निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज ऑनलाइन याचिका दाखल करण्यात येणार असून 20 फेब्रुवारी रोजी तातडीची सुनावणी घेण्याची मागणी केली जाईल. निवडणूक आयोगाचा आदेश सदोष असल्याचे सांगत उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला स्थगिती देण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी न्यायालयासमोर हे नमूद केले जाईल.

Shiv Sena Symbol: ‘रामाचं धनुष्यबाण रावणाला…’, राऊतांच्या संतापाचा स्फोट

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार, या याचिकेतील कायदेशीर त्रुटींच्या आधारे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले जाईल. आव्हान याचिकेचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या घटनेतील बदल हा एकतर्फी म्हणजेच लोकशाही पद्धतीने बहुमताच्या संमतीने झालेला नाही, असा आदेशाचा भाग आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत घडलेल्या घटनांबाबत आयोगाने ही दुरुस्ती योग्य प्रकारे मान्य केली होती. उद्धव गटाची तीच दुरुस्ती अलोकतांत्रिक असताना आता शिंदे गटाची तीच दुरुस्ती चुकीची कशी?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोगामध्ये सार्वत्रिक निवडणुकीत खासदार आणि आमदारांना मिळालेली मते मान्यतेचा आधार बनवलं जातं, परंतु निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही मते मिळाली आहेत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Shiv Sena पक्ष अन् चिन्ह गेलं! युवासेना, सेनाभवन कुणाकडे.. ‘सामना’ कुणाचा?

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे गटाचे असेही म्हणणे आहे की, त्याचा आधार आणि आकडेवारीत समावेश का करण्यात आला नाही? अखेर ती मतेही जनतेनेच दिली. याशिवाय असे अनेक तांत्रिक मुद्दे आणि कायदेशीर पेच आहेत ज्यांना अर्जाचा आधार बनवण्यात आला आहे. शिंदे गट संघटनेत कमकुवत होता आणि त्यामुळेच बहुमताने निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षघटनेत केलेला बदल अलोकतांत्रिक घोषित केला, जेणेकरून ते बाजूला व्हावे, असा उद्धव गटाचा दावा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT