आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा

मुंबई तक

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (1 मार्च) सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्य सरकारने हे अधिवेशन फक्त 10 दिवसच घेण्याचं ठरवलं आहे. यंदाचं अधिवेशन हे 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत असणार आहे. पण मूळ कामकाज हे आठ दिवसच चालणार आहे. फक्त 8 दिवसांसाठी अधिवेशन होणार असल्याने याबाबत विरोधकांनी प्रचंड नाराजी व्यक्त […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (1 मार्च) सुरुवात होणार आहे. कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्य सरकारने हे अधिवेशन फक्त 10 दिवसच घेण्याचं ठरवलं आहे. यंदाचं अधिवेशन हे 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत असणार आहे. पण मूळ कामकाज हे आठ दिवसच चालणार आहे. फक्त 8 दिवसांसाठी अधिवेशन होणार असल्याने याबाबत विरोधकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. राज्यात कोरोनाचे संकट बळावत असताना अधिवेशन नेमकं कसं घ्यायचं असा प्रश्न सरकारपुढे होता मात्र, कमी कालावधीसाठी अधिवेशन घेऊन हे अधिवेशन मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे.

दरम्यान, दरवर्षी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहा-पानाचं आयोजन केलं जातं मात्र, यंदा कोरोना संकटामुळे हा कार्यक्रमच रद्द करण्यात आला. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक हे थेट सभागृहातच एकमेकांसमोर येणार आहेत.

दुसरीकडे अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधकांना आता दुसऱ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरावं लागणार आहे. जर राठोडांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती पण कालच राठोडांनी राजीनामा दिल्यामुळे आता या प्रकरणावरुन विरोधकांना सरकारला फारसं घेरता येणार नसल्याचं बोललं जात आहे.

ही बातमी पाहा: ठाकरे सरकारला अधिवेशन घेण्यात मुळीच स्वारस्य नाही-फडणवीस

हे वाचलं का?

    follow whatsapp