Maharashtra Rains 2021: महाराष्ट्रात पावसाचा धूमाकूळ, मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसाचे सर्व अपडेट

मुंबई तक

मुंबई: मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. अशावेळी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरी भागात देखील पुराचं पाणी घुसलं असून त्यामुळे हजारो लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. जाणून घेऊयात राज्यात पुराची नेमकी स्थिती काय आहे त्याविषयी. 1. पालघर: पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. अशावेळी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरी भागात देखील पुराचं पाणी घुसलं असून त्यामुळे हजारो लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. जाणून घेऊयात राज्यात पुराची नेमकी स्थिती काय आहे त्याविषयी.

1. पालघर: पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. ग्रामीण भागासह मुख्य शहरांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हात नदी आणि वैतरणा नदीला पूर आला असून पुराचं पाणी मनोर परिसरात शिरल्याने मनोर गावाचा संपर्क तुटलाय. तर मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि पालघरला जोडणारा रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवरील लहान साकव, मोऱ्या वाहून गेल्याने रस्ते वाहतूक विष्कळीत झालीय.

पाण्याच्या प्रवाहामुळे मनोर येथील बांधन गावची मोरीच वाहून गेल्याने बांधन गावाचा संपर्क तुटला आहे. मनोर गावातील महावितरण विभागाचे सब स्टेशन पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अनेक सखल भागात असलेल्या घरात आणि सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp