जितेंद्र आव्हाडांच्या ओबीसींबद्दलच्या विधानामुळे नव्या वादाला फुटलं तोंड; राजीनाम्याची मागणी

मुंबई तक

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जितेंद्र आव्हाडाचं विधानावर बोट ठेवत भाजप आक्रमक झाली असून, थेट जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपीचंद पडळकर यांनीही या विधानावरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जितेंद्र आव्हाडाचं विधानावर बोट ठेवत भाजप आक्रमक झाली असून, थेट जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपीचंद पडळकर यांनीही या विधानावरून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र थेट उत्तर देण्याचं टाळलं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांनी हे विधान केलं. “खरं तर ओबीसींवर फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं, तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला महार समाज होता. कारण ओबीसींनी लढायचंच नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पगडा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसत. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येतात. नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे, केंद्र सरकारशी दोन हात करावे लागतील”, असं आव्हाड म्हणाले.

भाजपने भाषणाचा व्हिडीओ केला शेअर, राजीनाम्याची मागणी

हे वाचलं का?

    follow whatsapp