डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना! पाणीटंचाईने घेतले एकाच कुटुंबातील पाच जणांचे प्राण

मुंबई तक

डोंबिवलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर मृतदेह नेण्यात आलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वाढत्या पाऱ्याबरोबच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन धडपडत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

डोंबिवलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर मृतदेह नेण्यात आलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

अनेक ठिकाणी वाढत्या पाऱ्याबरोबच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन धडपडत असल्याचं दृश्य ग्रामीण भागात दिसून असून, कल्याण ग्रामीणमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे.

पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना जीव गमावावा लागला. शनिवारी (७ मे) दुपारी कपडे धुण्यासाठी आणि इतर वापरासाठी नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणाचा खदानीत बुडाल्याने मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp