केरळात विध्वंस! पावसाने हाहाकार; 21 जणांचा मृत्यू, मदतकार्याला वेग

मुंबई तक

महाराष्ट्रापाठोपाठ पावसाने केरळाला तडाखा दिला असून, राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. केरळातील काही जिल्ह्यांत भूस्खलन आणि महापुरांमुळे हाहाकार उडाला असून, आतापर्यंत यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळात पावसाचं तांडव सुरु असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं आहे. पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असून, आतापर्यंत भूस्खलन आणि इतर घटनांमध्ये तब्बल 21 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रापाठोपाठ पावसाने केरळाला तडाखा दिला असून, राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. केरळातील काही जिल्ह्यांत भूस्खलन आणि महापुरांमुळे हाहाकार उडाला असून, आतापर्यंत यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळात पावसाचं तांडव सुरु असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं आहे. पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असून, आतापर्यंत भूस्खलन आणि इतर घटनांमध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण बेपत्ता आहेत.