भारत अडचणीत असला म्हणून काय झालं, काळजी करु नका ‘हे’ मित्र आहेत खंबीर!

मुंबई तक

मुंबई: कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट हे मागील वर्षभरापासून जगावर (World) घोंघावत आहे. त्यातही भारत (India) हा रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. कारण आतापर्यंत 2 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय सेवेवर (Medical Service) प्रचंड ताण पडत आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट हे मागील वर्षभरापासून जगावर (World) घोंघावत आहे. त्यातही भारत (India) हा रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. कारण आतापर्यंत 2 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर अक्षरश: कहर केला आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय सेवेवर (Medical Service) प्रचंड ताण पडत आहे. त्यातच वैद्यकीय सेवेशी निगडीत अनेक अत्यावश्यक गोष्टींची प्रचंड वानवा जाणवत आहे. त्यामुळे हा काळ भारतासाठी प्रचंड अडचणीचा असा आहे. मात्र, असं असलं तरीही भारत हा लढवय्या देश आहे आणि त्यामुळेच आता भारताचे खरे मित्र देखील त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. भारताचे हे मित्र फक्त पाठिशीच नाही तर भरभरुन मदत देखील करत आहेत.

भारतात वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे आणि प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासन प्राणपणाने झगडतं आहे. अशावेळी अनेक मित्र देशाने भारताला सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत भारताला अनेक देशांनी मोलाची मदत केली आहे. जाणून घेऊयात कोण आहे हे भारताचे खरे मित्र!

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

पाहा कोरोना संकट काळात आतापर्यंत कोणकोणता देश भारताच्या मदतीला आला आहे धावून:

हे वाचलं का?