Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली?

मुंबई तक

Lok Sabha Election Voting Percentage First and Second Phase : दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक आयोगाने (ECI) मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाले आहे. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगाने नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आयोगाने दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक होता.

ADVERTISEMENT

दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाले आहे.
election commision releases final voter turnout data first phase second phase voting percentage
social share
google news

Lok Sabha Election Voting Percentage First and Second Phase : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. हा दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक आयोगाने (ECI) मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाले आहे. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगाने नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आयोगाने दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक होता. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली? आणि आकडेवारी जाहीर करण्यात इतका विलंब का होतोय? असा सवाल उपस्थित होत आहे. (election commision releases final voter turnout data first phase second phase voting percentage) 

लोकसभेच्या 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यानंतर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले होते. यानंतर निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले आणि दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले आहे. 

निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 60.96 टक्के मतदान झाले. यानंतर, 30 एप्रिल रोजी संध्याकाळी, आयोगाने माहिती दिली की दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या चौथ्या दिवशी आयोगाने दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक आढळला होता. इतक्या दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे ही वाचा : निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

नेत्यांनी घेतला आक्षेप

मतदानाच्या टक्केवारीत दिसत असलेल्या या फरकानंतर अनेक नेत्यांनी यावर निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी एक्सवर लिहिले की, “दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या 4 दिवसांनंतर जाहीर झालेला आयोगाचा अंतिम डेटा 5.57% ची वाढ दर्शवितो. हे सामान्य आहे का? मला काही समजत नाही का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp