मराठी भाषा दिन : मराठीचा ‘अभिजात दर्जा’ कुठे अडकलाय?; केंद्राची भूमिका काय?

मुंबई तक

२७ फेब्रुवारी. मराठीतील प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन! त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि मराठी भाषा दिनाची चाहूल लागली की मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दलची चर्चा सुरू होते. अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होतेय, पण अजून पूर्ण झालेली नाही. कुठे अडकलाय अभिजात दर्जा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

२७ फेब्रुवारी. मराठीतील प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन! त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि मराठी भाषा दिनाची चाहूल लागली की मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दलची चर्चा सुरू होते. अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होतेय, पण अजून पूर्ण झालेली नाही. कुठे अडकलाय अभिजात दर्जा देण्याचा निर्णय?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीने जोर धरल्यानंतर काही वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव दिल्ली दरबारी म्हणजे केंद्राकडे पाठवण्यात आला. मात्र, जवळपास अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. मागील साडेआठ वर्षांपासून मराठीच्या अभिजात भाषेचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

अभिजात भाषेचा दर्जासाठी मिळण्याचे निकष कोणते?

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी त्या भाषेतील दीड ते २००० वर्षांच्या कालावधीतील प्रारंभिक ग्रंथ वा नोंदीं प्राचीन असाव्यात. ते मूळ त्याच भाषेतील लिहिलेले असावेत. अनुवादित केलेले नसावेत. त्या भाषेतील प्राचीन ग्रंथांचा एक असा भाग जो पिढ्यानपिढ्या मौल्यवान वारसा समजला जातो. त्या भाषेला मूळ साहित्यिक परंपरा असणं आवश्यक असून, ती अन्य भाषिक समुदायाकडून घेतलेली असू नये, असे निकष ठरवण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp