लग्नाच्या गाठी स्वर्गात नाही, तर नरकात बांधल्या जातात; पतीला जामीन देताना न्यायालयाची टिप्पणी

विद्या

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात हे वाक्य आपण आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. परंतू मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान जस्टीस सारंग कोतवाल यांनी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पतीचा अर्ज मंजूर करत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात. पत्नीकडून हुंडा मागितल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका पतीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात हे वाक्य आपण आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. परंतू मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान जस्टीस सारंग कोतवाल यांनी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या पतीचा अर्ज मंजूर करत महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात.

पत्नीकडून हुंडा मागितल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप असलेल्या एका पतीच्या जामिन अर्जावर आज जस्टीस कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या प्रकरणात पती आणि पत्नीने एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्याचं कोर्टाच्या लक्षात आलं. “FIR पाहिली असता पती आणि पत्नी हे आता एकमेकांसोबत राहू शकत नाहीत असं दिसतंय. त्यांच्यात सारखी भांडणं होत आहेत. लग्नगाठ ही स्वर्गात नाही तर नरकात बांधली जाते”, असं मत जस्टीस कोतवाल यांनी नोंदवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये पत्नीने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. २०१७ साली लग्नादरम्यान मुलाच्या घरच्यांनी आपल्या आई-वडिलांकडून प्रत्येक सदस्याला एक सोन्याचं नाणं मागितलं होतं. परंतू माझ्या घरचे ही मागणी पूर्ण करु शकले नाहीत त्यामुळे मुलाच्या घरच्यांनी माझा छळ करायला सुरुवात केली. आपल्या मुलासोबत वेगळं राहण्यासाठी आपण नवऱ्याला साडेतेरा लाख रुपये दिल्याचंही पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. इतकच नव्हे तर पत्नी आपला छळ करते हे दाखवण्यासाठी पत्नी स्वतःला जखमा करुन घेतल्याचंही पत्नीने तक्रार अर्जात म्हटलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp