Maharashtra BJP President Meet MNS chief Raj Thackrey: भाजप-मनसेची युती होणार? चंद्रकात पाटील थेट ‘कृष्णकुंज’वर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. आज (6 ऑगस्ट) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही भेट होणार आहे. मागील काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि भाजपची जवळीक वाढत आहे. अशावेळी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसेची युती (Alliance) होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

राज्यात आगामी काही महिन्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी भाजप महाविकास आघाडीसमोर एकटी पडू शकते. अशावेळी शिवसेनेसारख्या पक्षाला टक्कर देण्यासाठी भाजप मनसेला सोबत घेऊ शकते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची नाशिकमध्ये चंद्रकांत पाटलांशी भेट झाली होती. अशावेळी आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांची भेट होत असल्याने भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

पाहा या भेटीआधी चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आम्ही राष्ट्रीय विचारांचे राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे परप्रांतियांबाबतची भूमिका तीच राहिली तर आमची त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही. पण आमची त्यांच्यासोबत मैत्री राहिल.’

‘सकाळी 11.30 वाजता सदिच्छा भेट देण्यासाठी जाणार आहे. स्वाभाविकपणे दोन नेते जेव्हा भेटतात तेव्हा सदिच्छा भेटीसोबतच राजकारणावर देखील चर्चा होते. प्रामुख्याने जो आमचा मुद्दा आहे की, जी परप्रांतियांबद्दलची त्यांची जी भूमिका बदलेपर्यंत आमची युती होऊ शकत नाही. याविषयामध्ये त्यांनी उत्तर भारतीयांसमोर दिलेल्या भाषणाची क्लिप त्यांनी मला दिली. ती ऐकल्यानंतर देखील माझ्या मनात प्रश्न आहे की, त्यांनी जे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत त्या मुद्द्यांबाबत आमचं दुमत आहे. त्यामुळे आता त्यांची जी भेट घेणार आहे त्यामध्ये चर्चेत हे सगळे मुद्दे घेणार आहे.’

ADVERTISEMENT

‘ही युतीची नांदी नाही. कुठलाही आता प्रस्ताव नाही. मी निर्णय करणारा एकटा नाहीए. आमच्याकडे टीम निर्णय करते. परंतु ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ता कशाला विचारायचा. परप्रांतीयांच्या भूमिकेबद्दल दुमत असेल पण राज ठाकरे यांचं जे व्यक्तीमत्व आहे आणि अशा व्यक्तीमत्वाची महाराष्ट्राला आवश्यकता आहे. केवळ मनसे या पक्षाला काही मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांनी व्यापक राजकारण केलं पाहिजे. हा सगळा परप्रांतीयांच्या विषयाबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘आमचं म्हणणं आहे की, देशाचा नागरिक कुठेही राहू शकतो. देशातील दोन राज्यात परमिटची कुठे गरज आहे का? हो.. स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये 80 टक्के जागा हा निर्णय आधीच झाला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. राजकारणामध्ये एखाद्या घटनेमधून कायमचे निर्णय केले तर त्यातून पक्षाचं देखील नुकसान होतं आणि समजाचं देखील.’

‘त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडे जायचंच नाही कधी.. असं आपण म्हणू शकत नाही किंवा तसं काही कारण नाही. पण दुसऱ्या बाजूने युती करायची असा प्रस्तावही कुठला नाही. मी फक्त सदिच्छा भेट घेणार आहे.’ असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

ठाकरे बंधू एकत्र येणार का? दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…

राज्यातील सत्ता आणि आपला मित्र पक्ष गमावल्यानंतर राज्यात नव्या राजकीय मित्राची मदत भविष्यात भाजपला भासू शकते. अशावेळी मनसेने जर भाजपसोबत युती केल्यास त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. हेच जाणून आता नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे भाजप-मनसेची युती होण्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT