Jayant Patil: “एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना सोडणार नाहीत”

मुंबई तक

एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना (Sharad Pawar) सोडणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मिशन बारामती (Mission Baratmati) आणि मिशन महाराष्ट्र असं आखलं गेलं आहे. भाजपचं (BJP) नेहमीचं प्रचारतंत्र आहे. मात्र त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना (Sharad Pawar) सोडणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मिशन बारामती (Mission Baratmati) आणि मिशन महाराष्ट्र असं आखलं गेलं आहे. भाजपचं (BJP) नेहमीचं प्रचारतंत्र आहे. मात्र त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि होणार नाहीत असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

भाजपचं मिशन बारामती काय आहे?

शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. भाजपनं बारामती पिंजून काढण्यास सुरूवात केली. या मतदारसंघाचा दौरा लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत काय म्हटलं होतं?

गणपतीची स्थापना होऊन सातवा दिवस आहे. आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत. गणपती पुढच्या वर्षी परत येत असतो. २०२४ पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याची सुरुवात करायला बारामतीत आले.’

हे वाचलं का?

    follow whatsapp