अमरावती : पोलीसानेच माझ्या बायकोला पळवून नेलं, इंजिनीअरने लावलेल्या आरोपांमुळे खळबळ

मुंबई तक

अमरावतीमधल्या एका इंजिनीअर तरुणाने पोलीस यंत्रणेवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार इंजिनीअर तरुणाचा आपल्या बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पुनर्विवाह केला होता. मात्र दुसरं लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच पोलीस ठाणेदार अमूल बच्छाव यांनी आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. अमुल बच्छाव हे अमरावती येथील येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावतीमधल्या एका इंजिनीअर तरुणाने पोलीस यंत्रणेवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार इंजिनीअर तरुणाचा आपल्या बायकोसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पुनर्विवाह केला होता. मात्र दुसरं लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्येच पोलीस ठाणेदार अमूल बच्छाव यांनी आपल्या पत्नीला पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे.

अमुल बच्छाव हे अमरावती येथील येवदा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदाराने केलेल्या आरोपामुळे अमरावती पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमूल बच्छाव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन बऱ्याच महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असून आपल्या पत्नीलाही पळवून नेल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तक्रारदार तरुणाने बच्छाव यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीसोबत लगट करतो म्हणून तक्रार दाखल केली होती. यानंतर १० डिसेंबर रोजी बुलढाणा येथे आपल्याला बच्छाव यांच्या नावाचा संदर्भ देऊन एका व्यक्तीने धमकावल्याचंही या तरुणाने सांगितलं. आपल्या पदाचा गैरवापर करुन बच्छाव याने पत्नीसोबत शरिरसंबंध प्रस्थापित केल्यामुळे या तरुणाने घटस्फोट घेतला होता.

चंद्रपूरमध्ये नातवाने केली आजोबांची हत्या, घरात मृतदेह पुरल्याचं 45 दिवसांनी उघड

हे वाचलं का?

    follow whatsapp