राज ठाकरेंना औरंगाबाद सभेपूर्वीच झटका; पोलिसांच्या आदेशामुळे सभेवरही प्रश्नचिन्ह
मशिदींवरील भोंगे हटवण्याचा कार्यक्रमावर अजेंड्यावर घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात […]
ADVERTISEMENT

मशिदींवरील भोंगे हटवण्याचा कार्यक्रमावर अजेंड्यावर घेतल्यानंतर मनसे पुन्हा एकदा चर्चेत आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला असून, १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे सभेपूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
पुणे दौऱ्यावर असतानाच राज ठाकरे यांनी आगामी काळातील दौऱ्यांबद्दल माहिती दिली होती. औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादमधील सभेची मनसेकडून जोरदार तयारीही केली जात आहे. मात्र, सभेची घोषणा झाल्यानंतर औरंगाबादेतील विविध पक्ष-संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच आता औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या सभेचाही आदेशात उल्लेख केलेला आहे. मनसेकडून हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्याला विविध पक्ष, संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांकडून आंदोलनं केली जाण्याची शक्यता आहे.
संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निर्दशने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे.