Sandeep Kshirsagar : "धनंजय मुंडे मंत्री, म्हणून वाल्मिकला VIP ट्रीटमेंट आणि संरक्षण मिळतंय", क्षीरसागर थेट बोलले

मुंबई तक

आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना काळजी घेण्याची विनंत केली. यावेळी त्यांना वाल्मिक कराडबद्दल प्रश्न विचारला असता संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंडेंमुळे वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट

point

संदीप क्षीरसागर यांचे गंभीर आरोप

point

मनोज जरांगेंच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू असलेल्या लढ्यानंतर जरांगे आता पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना काळजी घेण्याची विनंत केली. 

हे ही वाचा >> Thane : प्राचार्याकडूनच कॉलेजमधील महिला शिक्षकांचा लैंगिक शोषण, मनसेनं चोप दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल

संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मनोज जरांगेंची तब्बेत आधीच खराब आहे. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आम्ही आंदोलनात सोबत होतो, तेव्हा पाहिलंय, त्यांचे हात पाय थरथर करत होते. त्यांनी आमच्याकडे जी जबाबदारी दिली, ती आम्ही पूर्ण करू. सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनात बोलायची असेल ती जबाबदारी पूर्ण करू. समाज जरांगेंसोबत आहे, त्यामुळे त्यांना थोडाही त्रास झाला, तर लोक रस्त्यावर उतरतात. जरांगेंच्या पहिल्या आंदोलनामुळे अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. आम्ही त्यांच्या मागणीसोबत आहोत असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

हे ही वाचा >> Tahawwur Rana : 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला भारतात आणणार, संजय राऊत म्हणाले दाऊद...

वाल्मिक कराडबद्दल प्रश्न विचारला असता संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केले आहेत.  "मी पहिल्यापासून सांगतोय, CDR तपासले तर सगळं समोर येईल. CCTV सुद्धा समोर आलेत, आम्ही म्हटलो ते समोर येतंय. वाल्मिकमुळे मास्टरमाईंड असून, वाल्मिक कराडमुळेच जिल्ह्यात दोन जातीत तेढ निर्माण होतंय. तो आत राहिला तर जिल्हा व्यवस्थित राहील. धनंजय मुंडेंकडे मंत्रिपद असल्यामुळेच वाल्मिक कराडला संरक्षण मिळतंय, त्यामुळे त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय. त्यांना मंत्रिपदावरुन काढलं की, वाल्मिकला कुठेच हालवायची गरज नाही" असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp