अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ग्रामीण भागात कलम १४४ लागू

मुंबई तक

त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत. अमरावती आणि इतर भागांत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण भागात काही समाजकंटक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत.

अमरावती आणि इतर भागांत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण भागात काही समाजकंटक इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये, गटामध्ये तेढ निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणावळा : तन्वी बंगल्यात सुरू होती अश्लिल डान्स पार्टी! पहाटेच पडली धाड, 9 पुरुष व 8 महिलांना अटक

१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत पुणे ग्रामीण भागात १४४ कलमाअंतर्गत खालील गोष्टी करण्यात मनाई करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp