मेहुणीसोबत लग्नाला नकार, संतापलेल्या दीराने वहिनीसोबत केलं नको ते!

मुंबई तक

दीराने आपल्या वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. या हत्येमागं एक धक्कादायक कारण असल्याचे समोर आहे. याविषयी गावातही चर्चा रंगली आहे. घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मेहुणीसोबत लग्नाला नकार

point

संतापलेल्या दीराने वहिनीसोबत केलं नको ते!

Crime News : कौटुंबिक वादातून एका दीराने आपल्या वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. पूनम असं तीस वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी दीर अमरजीत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील ही घटना आहे. दीराने वहिणीला संपवण्याचा टोकाचा निर्णय नेमका का घेतला, जाणून घेऊया.

हत्येच्या दिवशी काय घडलं?

हत्या झाली त्यादिवशी पूनम स्वयंपाक आटोपून घराबाहेर बसली होती. याच दरम्यान, तिचा दीर अमरजीत कुऱ्हाड घेऊन आला आणि त्याने थेट तिच्या मानेवर वार केला. घटनेनंतर अमरजीतने आजूबाजूच्या लोकांना बोलावण्यासोबतच स्वतः 112  क्रमांकावर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद पांडे घटनास्थळी पोहोचले, तिथे आरोपी तरुण मृतदेहाजवळ कुऱ्हाड घेऊन बसला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.

हे ही वाचा : दहा वर्षांपासून एकुलत्या एका मुलीवर बलात्कार, आईनेही गप्प राहण्यास सांगितले; कॉन्ट्रॅक्टर बापासोबत मुलीनं काय केलं?

का केली हत्या?

मृत महिलेचा पती सुजित हा वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक कामाला आहे. घटनेच्या वेळी पूनमची सासू मुनका देवी आणि सासरे तेज बहादूर शेतात होते, तर तिचा एकुलता एक मुलगा हर्ष (4) शाळेत गेला होता. घटनेची माहिती मिळताच सुजित आणि मुलगा हर्ष घरी परतले. अमरजीतला वहिनीच्या बहिणीशी लग्न करण्यासाठी हट्ट धरून होता, मात्र वहिनी आणि तिचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. या कारणावरून यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. महिनाभरापूर्वी पूनमच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमरजीतवर गुन्हा नोंदवून कारवाई केली होती. 

हे ही वाचा : सहकारी महिलेच्या छातीकडे टक लावून पाहणे, 'चोरून पाहण्याच्या' गुन्ह्यात मोडत नाही, हायकोर्टाने ‘ती’ FIR केली रद्द

घराबाहेर गावकऱ्यांची गर्दी

घटनेनंतर घराबाहेर महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक लोकांमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने कौटुंबिक संबंधांमधील तणाव आणि वादांचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. समाजात अशा प्रकारच्या घटना चिंतेचा विषय बनल्या असून, त्याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात त्वरित कारवाई केली आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये काही प्रमाणात विश्वास निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?