मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली असेल, म्हणूनच…; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचं उत्तर
राज्यात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेनं फेर धरला असल्याचं दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणून नका असं विधान केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांचा भविष्यातील सहकारी असा उल्लेख केला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं असून, ‘मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली असेल’, इतकाच आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ असल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील चेंबूर येथे भाजप […]
ADVERTISEMENT

राज्यात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेनं फेर धरला असल्याचं दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणून नका असं विधान केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांचा भविष्यातील सहकारी असा उल्लेख केला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केलं असून, ‘मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली असेल’, इतकाच आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ असल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबईतील चेंबूर येथे भाजप कार्यालयाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. यावेळी त्यांनी शिवसेनेसह सरकारवर टीका केली. ‘भाजप आपलं कार्यालय हफ्ता वसुली करून बांधत नाही. हितचिंतकांच्या मदतीने बांधते’, असं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.
‘…आणखी 48 तास बाकी आहेत’, चंद्रकांत पाटलांनी नेमके कसले संकेत दिले?
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीस काय म्हणाले?










