Aditya Thackeray यांच्या सभेत जोरदार राडा; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Shiv sena leader Aditya Thackeray Aurangabad rally : औरंगाबाद : शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या महालगाव येथील सभेदरम्यान जोरदार राडा झाला. यानंतर ठाकरेंना सुरक्षारक्षकांच्या मदतीने सभास्थळ सोडावं लागलं. सभास्थळी बाजूलाच रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणूक सुरु होती. यावेळी सभेत व्यक्तय होतं असल्यानं पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली. यावेळी चिडलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shiv sena leader Aditya Thackeray Aurangabad rally :

औरंगाबाद : शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या महालगाव येथील सभेदरम्यान जोरदार राडा झाला. यानंतर ठाकरेंना सुरक्षारक्षकांच्या मदतीने सभास्थळ सोडावं लागलं. सभास्थळी बाजूलाच रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि मिरवणूक सुरु होती. यावेळी सभेत व्यक्तय होतं असल्यानं पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने आणि आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. (shiv sena leader Aditya Thackeray Aurangabad rally crises what happen)

नेमकं काय घडलं?

नाशिक, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारपासून सुरु झाला आहे. यात ते काल नाशिक जिल्ह्याचा दौरा संपवून औरंगाबादमध्ये गेले. यावेळी महालगावमध्ये पोहचले. यावेळी सभास्थळी बाजूलाच रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात होती. सभेमध्ये व्यक्तय येत असल्यानं पोलिसांनी भीमसैनिकांना मिरवणूक आणि डीजे थांबविण्याची विनंती केली.

यामुळे चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने स्टेजवर किरकोळ दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरात तणाव झाल्याचं बघता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. खबरदारीचा उपाय म्हणून आदित्य ठाकरेंनीही स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. यावेळी भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp