ऑपरेशननंतर पहिल्यांदाच जनतेसमोर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं..
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसापूर्वीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केले अनेक दिवस मुख्यमंत्री हे आपल्या निवासस्थानावरुनच राज्याचं कामकाज पाहत होते. एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशनाला देखील ते हजर राहू शकले नव्हते. असं असताना मुख्यमंत्री आज (1 जानेवारी) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसापूर्वीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यानंतर मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केले अनेक दिवस मुख्यमंत्री हे आपल्या निवासस्थानावरुनच राज्याचं कामकाज पाहत होते. एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशनाला देखील ते हजर राहू शकले नव्हते. असं असताना मुख्यमंत्री आज (1 जानेवारी) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर आले.
आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेसमोर आपली मतं व्यक्त केली. मात्र, यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा देखील केली आहे. पाहा मुख्यमंत्री आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं..
आजपासून सुरु झालेलं नवीन वर्ष हे सर्वांना सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो. यापुढची सुद्धा सर्व वर्ष उत्कर्षाची जावोत या माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. अनेकांना असं वाटलं असेल की, मी टीव्हीवर दिसलो की, म्हणजे मी फक्त कोरोनावर बोलणार. पण मी आज कोरोनावर बोलणार नाहीए. आवश्यकता लागू नये पण लागली तर काही दिवसांनी बोलेन. आजचा हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे.