समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत-रामदास आठवले
समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. जर नवाब मलिक यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे. अशा प्रकारे समीर वानखेडे यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी आवश्यकता नाही. नवाब मलिक यांचे व्यक्तीगत फोटो व्हायरल केले जात आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे. आज मला ज्ञानेश्वर वानखेडे […]
ADVERTISEMENT

समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. जर नवाब मलिक यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे. अशा प्रकारे समीर वानखेडे यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी आवश्यकता नाही. नवाब मलिक यांचे व्यक्तीगत फोटो व्हायरल केले जात आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे असंही आठवले यांनी म्हटलं आहे. आज मला ज्ञानेश्वर वानखेडे आणि क्रांती रेडकर हे दोघेही भेटले त्यांनी मला जातीचे सगळे पुरावे दाखवले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. आम्ही समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले रामदास आठवले?
आज क्रांती रेडकर म्हणजेच समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर या दोघांनीही माझी भेट घेतली. या दोघांनीही मला त्यांची जातीची प्रमाणपत्रं दाखवली आहेत. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी धर्म परिवर्तन केलेलं नाही. त्यांचं लग्न एका मुस्लिम महिलेशी झालं होतं. मात्र त्यांनी धर्म बदलला नव्हता. परस्पर सहमतीने हे लग्न झालं होतं. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं असंही आठवले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर समाज म्हणून आम्ही क्रांती रेडकर, समीर वानखेडे आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या पाठिशी उभे आहोत. त्यांनी जातीचा गैरफायदा घेऊन कुठलंही खोटं प्रमाणपत्र तयार केलेलं नाही असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम’ नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं उत्तर