देशातला सर्वात मोठा लफंगा आणि खंडणीखोर चोर म्हणजे किरीट सोमय्या-संजय राऊत

मुंबई तक

भाजप नेते किरीट सोमय्या हे कोर्लई गावाचा दौरा करत आहेत. रश्मी ठाकरेंचे 19 बंगले या ठिकाणी आहेत असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्या बंगल्यांचं नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी ते या गावाचा दौरा करत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांची आता लोकच धिंड काढतील असंही संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या हे कोर्लई गावाचा दौरा करत आहेत. रश्मी ठाकरेंचे 19 बंगले या ठिकाणी आहेत असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्या बंगल्यांचं नेमकं काय झालं ते पाहण्यासाठी ते या गावाचा दौरा करत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांची आता लोकच धिंड काढतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.किरीट सोमय्या म्हणजे देशातला सर्वात मोठा लफंगा, खंडणीखोर माणूस आहे, त्याच्यामागे तुम्ही लोक कशाला जाता? असा प्रश्न मीडियाला विचारत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यावर टीकेचे बाण चालवले आहेत.

‘जो मैं बोलता हूँ वो मै करता हूँ, जो नहीं बोलता वो….’ संजय राऊत यांचा फिल्मी अंदाज

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

‘कोर्लई गावातल्या जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. वारंवार यासंदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किरीट सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. बहुदा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. स्वतःच्याच बेनामी प्रॉपर्टी भाजपच्या लोकांना दिसत आहेत आणि ते दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली? यावर भाजपचे लोक गप्प का बसले आहेत? मात्र अन्वय नाईकला ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराचं समर्थन भाजपचे लोक करत होते.’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp