युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी; एअर इंडियाचं विमान भारताच्या दिशेनं झेपावलं
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील दोन भागांना स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर तणाव वाढला असून, भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने प्रवाशांना घेऊन भारताच्या दिशेनं झेपावलं. युक्रेन-रशिया संघर्ष वाढला असून, व्लादिमीर पुतीन यांनी दोनेत्स्क आणि लुहान्सक या […]
ADVERTISEMENT

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील दोन भागांना स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर तणाव वाढला असून, भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने प्रवाशांना घेऊन भारताच्या दिशेनं झेपावलं.
युक्रेन-रशिया संघर्ष वाढला असून, व्लादिमीर पुतीन यांनी दोनेत्स्क आणि लुहान्सक या दोन प्रातांना स्वतंत्र दर्जा दिला आहे. याचबरोबर युक्रेनच्या पूर्वेकडील सीमाभागात लष्करी कुमक वाढवली असून, तणाव वाढला आहे.
रशिया – युक्रेनच्या वादाचा भारतावर काय परिणाम होणार?
युक्रेन-रशिया संघर्षामुळे युद्धाचं वातावरण निर्माण होताना दिसत असून, भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारताने मोहीम हाती घेतली असून, आज एअर इंडियाच्या विमानाने २४२ भारतीयांना घेऊन भारताच्या दिशेनं उड्डाण केलं.










