वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ‘या’ जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश जारी

मुंबई तक

वर्धा: महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच चिंता देखील व्यक्त केली होती. याच सगळ्या दरम्यान आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आता जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वर्धा: महाराष्ट्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच चिंता देखील व्यक्त केली होती. याच सगळ्या दरम्यान आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आता जिल्ह्यात जमाव बंदी आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. तसेच लग्न व इतर कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींचे बंधन देखील असणार आहे. त्यामुळे आता गेल्यावेळेस प्रमाणेच पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात नागरिकांवर बंधनं असणार आहेत.

जाणून घ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात असणार काय नियम व अटी

हे वाचलं का?

    follow whatsapp