Niraj Gunde: देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक नाव घेत असलेले नीरज गुंडे आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाने आता वेगळं वळण घेतले असून समीर वानखेडेंवर आरोप करुन अडचणीत आणणाऱ्या नवाब मलिकांनी आता त्यांच्या मोर्चा भाजपकडे वळवला असून देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिकांनी फडणवीसांवर आरोप करताना नीरज गुंडे या व्यक्तीचे नाव घेतले असून ही व्यक्ती फडणवीसांची दूत होती आणि मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते कार्यालयापर्यंत सगळीकडे नीरज गुंडेचा मुक्त वावर होता असा आरोप केला.

त्याशिवाय नीरज गुंडे यांची फडणवीसांच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महत्वाची भूमिका होती. सीबीआय, ईडीच्या कार्यालयात नीरज गुंडेची उठबस असायची असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणवीस कायम नीरज गुंडेंच्या घरी जायचे आणि तिथे खलबतं व्हायची अशीही माहिती मलिकांनी दिली.

‘देवेंद्र फडणवीसांनी नीरज गुंडे यांच्याशी आपले जवळचे संबंध असले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील नीरज गुंडे यांचे घनिष्ट संबंध आहेत; तेव्हा नवाब मलिकांनी नीरज गुंडे कोण हे एकदा उद्धव ठाकरेंना विचारावे ‘ असा टोला नवाब मलिकांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

यानिमित्ताने नीरज गुंडे नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न समोर आला आहे.

ADVERTISEMENT

संघ परिवारातील गुंडे

नीरज गुंडेबद्दल सांगायचे झालं तर नीरज गुंडे यांचे आजोबा मुंबईमधल्या शिवाजी पार्क परिसरात संघाचे संचालक होते. नीरज गुंडे यांच्या आत्या गीता गुंडे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या आणि समन्वयाचे काम करायच्या. यामुळे संघ आणि भाजप परिवारातील अनेक नेत्यांशी गुंडे यांचे जवळचे संबंध आहेत असं बोललं जातं.

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध

भाजपचे प्रसिद्ध नेते सुब्रामण्यम स्वामी आणि नीरज गुंडे यांचे जवळचे संबंध होते. सुब्रामण्यम स्वामी यांच्यासोबतच नीरज गुंडे हे पहिल्यांदा मातोश्रीवर पोचले होते. इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि नीरज गुंडे यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

भाजप-शिवसेना युतीसाठी शिष्टाई

2019च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेना-भाजप यांच्यामध्ये जेव्हा राजकीय धुसफूस सुरु होती. तेव्हा शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे काम आणि दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम नीरज गुंडे यांनी केले होते. 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती न करण्याची घोषणा केली होती, असं म्हटलं जातं की यानंतर गुंडे यांनी मध्यस्थी करुन ठाकरे-फडणवीस भेट घडवून आणली.

2019मध्ये मुंबईतल्या चेंबूर येथे नीरज गुंडे यांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थाऩी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. याच बैठकीत सेना-भाजप युतीचे सुतोवाच करण्यात आले होते. ठाकरे-फडणवीसांच्य़ा याच बैठकीनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर गेले आणि 2019च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी भाजप शिवसेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सेना-भाजप युतीच्या पडद्यामागचे कलाकार म्हणून नीरज गुंडे यांचे नाव घेतले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतर जेव्हा भाजप आणि सेनेची युती फुटली तेव्हासुध्दा नीरज गुंडे यांनी युती पुन्हा यावी यासाठी मातोश्रीवर अनेक चकरा मारल्या पण तेव्हा नीरज गुंडे यांची शिष्टाई असफल ठरली आणि नंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. नीरज गुंडे हे स्वत: व्यावसायिक असल्याचे सांगतात. तसेच ते आरटीआय कार्यकर्ते असल्याची माहिती देखील मिळते.

नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या जास्त संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांना प्रत्युत्तर

ट्विटर वर सक्रिय

क्रिकेट क्षेत्रातली भ्रष्ट्राचार आणि अनियमितता उघडकीला आणण्यात नीरज गुंडे यांचा सक्रिय सहभाग असायचा. भाजप खासदार सुब्रामण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये नीरज गुंडे यांचे नाव आढळते. ते आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ते ईडी अधिकारी, गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करुन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या चौकशीची मागणी करत असतात.

सध्या नीरज गुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सलोख्याचे नसल्याची माहिती मिळते. सध्या राज्यात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ED ची कारवाई चालू आहे त्यांची माहिती नीरज गुंडे स्वत:च्या ट्विटर अकाऊटवरुन देत असतात. याच नीरज गुंडे यांचे नाव नवाब मलिकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT