भारत गणेशपुरे, सागर कारंडे खरंच ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार आहेत का?
गेली ८ वर्षे रसिक प्रेक्षकांचा लाडका शो म्हणजे चला हवा येऊ द्या.. या शोचे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत….. डॉ.निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भाऊ कदम यांचे तर असंख्य फॅन्स आहेत. मात्र आता भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्यामध्ये यापुढे दिसणार नाहीत अशी बातमी […]
ADVERTISEMENT

गेली ८ वर्षे रसिक प्रेक्षकांचा लाडका शो म्हणजे चला हवा येऊ द्या.. या शोचे महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत….. डॉ.निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भाऊ कदम यांचे तर असंख्य फॅन्स आहेत. मात्र आता भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे चला हवा येऊ द्यामध्ये यापुढे दिसणार नाहीत अशी बातमी आली आणि चला हवा येऊ द्याच्या प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला.
सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे हे दोघंही मालिका सोडणार आहेत अशा बातम्या आल्या आणि एकच चर्चा सुरू झाली की त्यामागचं नेमकं कारण आहे तरी काय? यानंतर मुंबई तकने थेट भारत गणेशपुरे यांनाच फोन केला. भारत गणेशपुरे यांना या बातम्यांबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मुंबई तकला सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
‘हवा येऊ द्या’ च्या सेटवर सोनालीचा कुल अंदाज